पोस्ट्स

किती सोसतात बिच्चारे हे आमदार! अशांना कोण आवरणार !

इमेज
  आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांनी आज वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘जेवण सडलेलं होतं, माझी उलटी झाली आणि त्यानंतर मी कँटीनमध्ये जसा होतो तसाच गेलो. कर्मचाऱ्याला समज दिली आणि प्रतिक्रिया दिली. ती माझी शैली होती आणि ती मला मान्य आहे,’’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. संजय गायकवाड यांनी डाळ, भात, चपाती अशी ऑर्डर दिली होती. पण त्यांच्या म्हणण्यानुसार जेवण सडलेले होते. दुसऱ्या घासावर उलटी झाल्यानंतर ते थेट कँटीनमध्ये गेले आणि कर्मचाऱ्याला विचारणा केली. डाळ इतरांना दाखवून सर्वांनी सडलेली असल्याचे मान्य केले, असंही त्यांनी सांगितले. “शिवसेना स्टाईलमध्ये दिलं उत्तर” : ‘‘मी त्याला मराठीत, हिंदीत, इंग्रजीत समजावले. पण तो ऐकत नव्हता. मग मी शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिलं. मला याचा पश्चाताप नाही,’’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. विरोधकांनी टीका केली असली तरी ‘‘माझ्या पक्षाच्या किंवा विरोधकांच्या आरोपांची मला पर्वा नाही,’’ असं गायकवाड म्हणाले. गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, तिथलं किचन अस्वच...

रमी, ड्रीम 11 मध्ये हरला, बीडचा ASI पोलीस चोर बनला! - दुसरी बाजू

इमेज
         जुगाराच्या नादात बीडचा पोलीस बनला चोर :    "दुसरी बाजु" बीडमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित मधुकर सुतार याला जुगाराची व्यसनाधीनता भोवली. ड्रीम 11 आणि रमीसारख्या ऑनलाइन गेम्समुळे तो कर्जबाजारी झाला. कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग स्वीकारला. 2024 मध्ये त्याने पोलीस अधीक्षक कार्यालयातून दहा बॅटऱ्या चोरल्या होत्या, ज्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले. तरीही, त्याने पुन्हा दोन साथीदारांसह सात दुचाकी चोरल्या. पोलिसांनी तपास करून त्याला अटक केली, आणि त्याने गुन्हा कबूल केला. सध्या तो जामिनावर आहे, पण जुगार आणि व्यसनांमुळे तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्याचे समोर आले आहे.   या आशयाच्या बातम्या आज जवळपास सर्वच स्थानिक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या आहेत.  एक वाचक किंवा प्रेक्षक म्हणून काहीतरी नवीन वाचायला किंवा पाहायला भेटते म्हणून अशा बातम्यांकडे आपण रोजच पाहतो आणि थोड्या वेळाने विसरून जातो पुन्हा नवी घटना नजरेसमोर येते आणि जुनी घटना आपण विसरून जातो   आज रोजी ग्रामीण व शहरी भागामध्ये बेकारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे...

फतवा :चार हजार शेतकरी काळ्या यादीत! नेमके दोषी कोण? - दुसरी बाजु

इमेज
  निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार  योजनांची खिरापत वाटते.त्यात स्वतःच्या यंत्रणेचे अपयश लपवून जगाचा अन्नदाता असलेल्या  पोशिंद्या शेतकऱ्याला लबाड ठरवून काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. त्याचा हा उहापोह! याबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा, शेअर करा दुसरी बाजु महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पिक विमा योजनेत खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ‘काळ्या यादीत’ टाकले जाणार आहे. याआधी ही कारवाई केवळ सेवा केंद्रे (CSC), एजंट आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींवर होत होती. परंतु आता थेट शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. राज्य कृषी विभागाच्या माहितीनुसार, 2024 साली तब्बल 4000 पेक्षा अधिक खोटे प्रस्ताव सादर झाले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने बीड, लातूर, नांदेड, परभणी, जालना, पुणे अशा अनेक जिल्ह्यांत कारवाई केली आहे. या निर्णयामुळे खोटी माहिती देणाऱ्यांना योजनेपासून वंचित करण्यात येणार असून, ब्लॅकलिस्ट झालेल्या     शेतकऱ्यांना काही वर्षांपर्यंत विम्याचा लाभ मिळणार नाही पण खरा प्रश्न हा आहे की फक्त श...

बा.. विठ्ठला तुझं मौन का? : गजानन खंदारे

इमेज
                बा विठ्ठला, तुझं मौन का?  विठोबा —  वारकरी संप्रदायाचा आत्मा, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि संत परंपरेचा गाभा.... हाच विठोबा दरवर्षी लाखो वारकऱ्यांसोबत पंढरपुरात पोहोचतो, भक्ताच्या कंठातून अभंग वाहतो, आणि त्याच्या दर्शनासाठी मन झुकतं. पण आजचा काळ विचारतो आहे — हा विठोबा फक्त मूर्तीपुरता उरलेला आहे का? का तो समाजातल्या घटनांवर शांत राहून केवळ एक प्रतीक म्हणून उभा आहे? विठोबाचं मौन ही काही वेळा भक्ताची कसोटी असते, पण अनेकदा ते समाजातील अन्याय, ढोंग आणि विसंगतींकडे दुर्लक्ष करत असल्यासारखं वाटतं. विचार करावा लागतो, की हा मौन नेमका कोणासाठी? आणि कशासाठी? आज भक्तीचा मार्ग थोडा दिशाहीन झाला आहे. विठोबाच्या नावाने मोठमोठे सोहळे होतात, पुष्पवृष्टी होते, भव्य मांडव उभे राहतात. पण त्या सगळ्यात खऱ्या भक्तीचा, समतेचा, संतांचा मूलभूत संदेश कुठेतरी हरवतो. संकट आलं की विठोबा आठवतो, सण आला की पूजेला गर्दी होते. पण तुकोबा, नामदेव, चोखोबा, बहिणाबाई यांनी ज्या तळमळीने समाजाशी नातं जोडून देवाला आपल्या कर्मात उतरवलं, तो भाव आज कमी पडतोय. संत...

भाषिक वादात आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करणार का? - दुसरी बाजु

इमेज
  सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेच्या वादाने तापलेली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता, एक मूलभूत प्रश्न समोर येतो – विद्यार्थ्यांना शिक्षण कोणत्या भाषेत द्यावं? मातृभाषा की इंग्रजी? आणि या भाषिक अस्मितांच्या राजकारणात मुलांचं शिक्षण म्हणजे त्यांचं भविष्य कितपत सुरक्षित आहे? भाषा ही संवादाचे साधन आहे, परंतु काहीवेळा ती राजकीय हत्यार बनवली जाते. भाषेच्या नावावर विभाजन निर्माण करणे हा समाजाच्या एकतेसाठी धोकादायक आहे. भाषेचा वापर सकारात्मक संस्कृतीच्या प्रचारासाठी व्हावा, न की राजकीय फायद्यासाठी पण यातून भाषिक वाद निर्माण केला जाऊन शिक्षणा विषयी बोलत असताना सध्या राज्यात सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांची पीक आले आहे. गुणात्मक दृष्ट्या किती विद्यार्थी यातून घडतात व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो हा प्रश्न गौण आहे मात्र यातून ऐपत नसताना पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण द्यावे लागते. मग आपली मुले जास्त स्वतःच्या मातृभाषेतून शिकणार की इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकणार हा प्रश्नही आता समाजामध्ये चर्चेला येऊ लागला आहे.  यातून मग भाषिक वाद निर्माण करून...

अर्धवट शारीरिक संबंधाने बिनसलं, कुरिअरवाला नव्हे तो तर बॉयफ्रेंडच; कोंढवा प्रकरणाची "दुसरी बाजु "

इमेज
 शिक्षणाच्या नावाखाली तुम्ही आम्ही शिक्षित तर झालो परंतु या शिक्षणाचा उपयोग पाश्चात्य संस्कृतीच्या अंधाणूकरणात अधिक होऊ लागला स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचा धिंगाणा तुम्ही आम्ही अनुभवतो आहोत. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मुलीची दृश्य आता छोट्या शहरातही दिसू लागली समाज नेमका कुठल्या दिशेने जातो आहे यावर विचार करायला कोणालाच वेळ नाही समाजावरच नैतिक दडपण दिवसेंदिवस कमी होते आहे आणि त्याचे प्रतिकूल परिणाम तुमच्या आमच्या समोर येत आहे.  खालील घटनेचा वृत्तांत हा कदाचित त्याचाच परिणाम असू शकतो. यावर आपली मत नोंदयला हरकत नसावी    पुणे शहर हे शिक्षणाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं, मात्र अलीकडील काळात गुन्हेगारी वाढल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच कोंढवा परिसरात एका तरुणीने कुरिअर बॉयने घरात घुसून बलात्कार केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही घटना गंभीर मानून पुणे पोलीस यंत्रणा खवळली आणि तब्बल 200 पोलिसांचं पथक पुण्यापासून दिल्लीपर्यंत कामाला लागलं. मात्र, पुढील तपासात जो व्यक्ती आरोपी म्हणून अटक झाला तो प्रत्य...

सुशील केडियाचे मनसे राज ठाकरेना ओपन चॅलेंज: काय आहे भाषिक दहशतवाद!

इमेज
                                        मुंबईतील भाषा-विवादाच्या घटनेची पार्श्वभूमी मुंबई उपनगरातील मीरा रोड येथे घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा "मराठी की हिंदी?" हा वाद चिघळला. ४८ वर्षीय दुकानदार बाबूलाल खिमजी चौधरी यांच्याकडे पाणी विकत घेण्यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मराठीत संवाद साधण्याचा आग्रह धरला. चौधरी यांच्या एका कामगाराने हिंदीत उत्तर दिल्याने दोन्ही गटांमध्ये वाद झाला. नंतर हा वाद हिंसक वळणावर गेला आणि मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदारावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे सार्वजनिक चर्चेला उधाण आलं. काही दिवसांनी 'केडियानोमिक्स'चे संस्थापक, मोठे गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी या प्रकरणात उडी घेतली. त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक्स (पूर्वीचा ट्विटर) वर टॅग करून लिहिलं – "मी मुंबईत ३० वर्षे राहिलो तरी मराठी शिकणार नाही, कारण तुमच्यासारखे लोक मराठीची काळजी घेत असल्याचं नाटक करतात." दुसरीकडे, राज्यमंत्री योगेश कदम यांनी जाहीर...