पोस्ट्स

शेती माती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आणि त्याच दिशी रात्रीचे बारा वाजण्या पुर्वी नवरा बायकोनी! घरातल्या...

इमेज
झेंडूचा सडा आणि TRP ची पूजा गोष्ट फार जुनी नाहीच. 2016 चे साल होते.दसऱ्याची  सुट्टी असल्याने आम्ही टीव्ही लाऊन बसलो होतो .   पंकजा मुंडेंनी भगवान गडावरचा होणारा दसरा सोडून सावरगावात मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले. आणि लगेचच विरोधकांच्या गिरणीत नव्या पीठाचं दळण सुरू झालं. राजकीय, धार्मिक, सामाजिक सगळा मसाला मिक्स करून टीव्ही वाल्यानी थेट  खिचडीच लावली. गडावर काय होणार? गडाखाली काय घडणार ?     पंकजाताईंच्या भाषणात किती आणि कसं बोलणार! याचीही आकडेवारी कॅमेरावाले मोजत होते. कोणत्या पायऱ्यांनी कोण वर जाणार हे पण सांगत होते  — जणू देशाचं भवितव्य त्या पायऱ्यांवर लटकलेलं होत ! मंडळी तयारीला लागली. पण मेळाव्याच्या भाषणांची काळजी महंत, कार्यकर्ते, पक्षांना कमीच, आणि टीव्हीवाल्यांनाच  जास्त होती . त्यांच्या डोळ्यात "लाइव" ची  सोनेरी फ्रेम चमकत होती — नेमका त्याच टायमाला माझा भाऊ नागपुरात,अन बाप पुण्यात होता — पुण्यांच्या  व्यवहारात मग्न असलेला बाप भक्तांसोबत फुलांचा सौदा करत, रस्त्यावर फुलं मोजत बसला होता , पण त्याच्या हातात फक्त रिकामा ...

शेतकरी आत्महत्या–खरंच कर्जा मुळे होतात का? खरे कारण काय ! तुम्हीही जाणून ...

इमेज
  भारतात शेतकरी आत्महत्या हा केवळ एक आकडा नाही, तर देशाच्या ग्रामीण हृदयावरचा एक खोल जखमेचा ठसा आहे. प्रत्येक वर्षी हजारो शेतकरी शेती सोडून जीवन सोडण्याचा निर्णय घेतात. सामान्यत: या घटनांचे कारण म्हणून नैसर्गिक आपत्ती – दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस,शेती पिकत नाही .इत्यादी   – कारणांचा उल्लेख केला जातो. पण खरंच ही गोष्ट खरी आहे काय ? एवढीच आहे का? कि यामागे इतर कारणे आहेत ..? नैसर्गिक आपत्ती –हे एक कारण , पण एकमेव नाही हवामानातील अनिश्चितता ही नक्कीच एक महत्त्वाची कारणं आहे. पिकांचे नुकसान, उत्पादनात घट, आणि बाजारभाव कोसळणे यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसतो. तरीसुद्धा, अनेकदा अशा परिस्थितीतून शेतकरी पुन्हा उभे राहतात. मग काही शेतकरी का नाही?  मानसिक व सामाजिक घटक – शेतकरी आत्महत्येतील लपलेली कारणे शेतकरी आत्महत्येबाबत बोलताना आपण बहुतेक वेळा कर्ज , नैसर्गिक आपत्ती किंवा पिकांच्या भावाचा घसरलेला दर यांवरच लक्ष केंद्रित करतो. पण शेतकऱ्याच्या आयुष्यात असे अनेक मानसिक आणि सामाजिक घटक असतात, जे त्याला टोकाचा निर्णय घेण्यापर्यंत ढकलतात.  ...

एकाच दोरीला पतीपत्नी लटकतात, सरकारचे काळीज का फाटत नाही?

इमेज
     आपल्या आजूबाजूला दररोज अनेक घटना घडत असतात. काही हृदय पिळवटून टाकणाऱ्या असतात, तर काही अजब-गजब, विस्मयकारक. आपण त्या एक बातमी म्हणून पाहतो, दोन क्षण चर्चा करतो… आणि मग विसरून जातो. नव्या घटना पुन्हा आपल्या नजरेसमोर येतात आणि मागच्या आठवणी पुसून टाकतात. पण एक घटना मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून कायम आपल्या समोर उभी आहे — शेतकरी आत्महत्या . या विषयावर चर्चा होते, भाषणे होतात, आश्वासने दिली जातात. सरकारे बदलली, माणसं बदलली, योजना बदलल्या… पण तोडगा मात्र कधीच बदलला नाही . कर्जबाजारीपणाची, पिकांच्या भावाची, निसर्गाच्या कोपाची, आणि सरकारी निष्क्रियतेची साखळी तशीच राहिली. अशा घटना जागतिक महासत्ता असल्याचा गर्व मिरवणाऱ्या आपल्या व्यवस्थेला लागलेला एक अमिट कलंक आहेत, असे म्हणणे अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. अशीच एक घटना पुन्हा नव्याने समोर आली आहे . दुःखद आणि काळीज पिळवटून टाकणारी हि  घटना — भरोसा गावच्या शेतकरी दाम्पत्याने एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश श्रीराम घुंटे आणि रंजना गणेश घुंटे — ही फक्त दोन नावे नाहीत, तर दोन जीवंत हृदयं होती, ज्यांनी ...

एकाच पावसाने शेती गेली पाण्यात; नेते कुठे? तर फोटोत! पंचनाम्याचे नाटक थांबवा !

इमेज
एकाच पावसाने शेती गेली पाण्यात; नेते कुठे? तर फोटोत! पंचनाम्याचे नाटक थांबवा ! पटतंय का पहा !    गजानन खंदारे  ( रिसोड )   एक दिवस आणि रात्रभर झालेल्या सततधार पावसाने शेतांमध्ये पाणी साचलं, नद्या पात्राबाहेर ओसंडून वाहिल्या आणि पिकांचं मोठं नुकसान झालं. पेरणी केलेल्या सर्वच पिकांचं व शेतीच जवळपास शंभर टक्के नुकसान झालं. शेतकऱ्यांनी मेहनतीने उभं केलेलं पीक एका रात्रीत उद्ध्वस्त झालं. ही घटना केवळ बातमीपुरती मर्यादित राहिली, तर लोकप्रतिनिधी फक्त पाहणी करून, फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत, सरकारकडे पंचनाम्याची मागणी करत असल्याचं सांगत आहेत. परंतु, धोरण आखणाऱ्या आणि निर्णय घेणाऱ्या या लोकप्रतिनिधींची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी काय आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे. 75 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही एका सततधार पावसाने शेतकऱ्यांचं सर्वस्व वाहून नेण्याची परिस्थिती का उद्भवते? हे ही वाचा..नेते की, पत्रक छाप भिकाऱ्याच्या टोळ्या!  गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि अनियमित पावसाने शेतीचं नुकसान वारंवार होत आहे. 2020 मध्ये अतिवृष्टी, 2021 मध्ये पूर, 20...

पावसात गेली पिके, शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार समजून घ्या

इमेज
  महाराष्ट्रात ऑगस्ट २०२५ मध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून, एकूण २० लाख एकरांपेक्षा जास्त शेती आणि पिके प्रभावित झाली आहेत.नांदेड आणि वाशिम जिल्हे सर्वाधिक प्रभावित आहेत, जिथे ७ लाख एकरांपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले.सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, फळे आणि भाजीपाला यांसारखी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.पावसामुळे १५ जणांचा मृत्यू झाला असून, १० लाख एकर शेती पाण्यात बुडाली आहे.काही भागांत पूर आला असून, नांदेडमध्ये लष्कराची मदत घ्यावी लागली.या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळेल. तज्ज्ञांच्या मते, नुकसान जाहीर केल्यापेक्षा कमी असले तरी, ते गंभीर आहे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला धक्का देत आहे.या पार्श्वभूमीवर, संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांसह राज्यातील अनेक राजकीय पक्ष व संघटना यांनी आंदोलन करून व निवेदन देऊन लक्ष वेधले आहे .२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी काल ...

बबनराव लोणीकर लोणी खरंच पघळलं का?

इमेज
    परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात गावातील काही तरुणांवर केलेली टीका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. भाषणात त्यांनी "तुझ्या अंगावरचे कपडे, तुझ्या पायातील बूट, तुझ्या मायचा पगार, तुझ्या बायकोच्या खात्यातले पैसे" हे सगळं सरकारने दिलं असल्याचं जाहीरपणे म्हटलं. त्यांनी सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांबाबत अश्लील आणि खालच्या पातळीवरची भाषा वापरली. हे केवळ दुर्दैवीच नाही तर धोकादायकही आहे.  लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला सरकार, पक्ष किंवा नेत्यावर टीका करण्याचा अधिकार आहे. लोकप्रतिनिधी या टीकेला उत्तर देत असताना जर त्यांच्या तोंडून मग्रूर, खाजगी आणि उपहासात्मक भाषा बाहेर पडत असेल, तर ही गोष्ट गंभीरपणे विचारात घ्यायला हवी. बबनराव लोणीकर यांनी जो भाषेचा स्तर गाठला, तो लोकप्रतिनिधीला शोभणारा नाही. त्यांनी दिलेलं स्पष्टीकरणही तितकंच हास्यास्पद होतं. ही आमची ग्रामीण बोलीभाषा आहे, आम्ही कार्टा म्हणतो, माय-बाप म्हणतो असं सांगून त्यांनी खोटं सहानुभूतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला. पण खेड्यातील भाषा म्हणजे असभ्य बोलणं असं गृहीत धरायला कोणी परवानगी दिली आहे?...