पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फोन पे गुगल पे वापरताय सावधान ! भाजी विक्रेत्याला तब्बल 29 लाखाची GST नोटीस

इमेज
एखाद्या झोपडीत राहणाऱ्या गरिबाला लाखाचे विज बिल !   लातूरच्या एका   शेतकऱ्याला  त्याच्याकडे विहीरच नसताना  ₹90,000 ची पाणीपट्टीची मागणी नोटीस आली.  शेतात विहीरच खोदली  नसताना ती चोरीला कशी जाते यावरचा सिनेमा आपण सर्वांनी पहिलाच असेल. चुकीच्या डिजीटल नोंदीमुळे अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो नंतर प्रशासनाचे खेटे मारल्यावर ह्या चुका काही वेळा दुरुरुस्त पण  होतात पण त्यापुढे  आज एक लीडिंग  बातमी अनेकांचे लक्ष वेधून गेली कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील शंकर गौडा नावाच्या एका भाजी विक्रेत्याला तब्बल  ₹२९ लाखांची जीएसटी नोटीस मिळाल्याने लघु व्यवसायिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यांनी मागील चार वर्षांपासून थेट शेतकऱ्यांकडून भाजी घेत, ग्राहकांना विक्री केली. मात्र, UPI पेमेंटच्या माध्यमातून झालेल्या ₹१.६३ कोटी रुपयांच्या व्यवहारांवर आधारित ही नोटीस आहे.  भाजी विक्रेत्याला २९ लाखाची जीएसटी नोटीस मिळाल्याने खळबळ माजली आहे. मागील ४ वर्षापासून महापालिका मैदानाशेजारी भाजी विक्री करणाऱ्या दुकानदाराला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की डि...

आता सर्वच ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सात हजार रुपये. ! काय खरं काय खोटं -दुसरी बाजू

इमेज
 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सात हजार रुपये.. काय आहे योजना??   गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी “लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. ही योजना राज्यातील महिला वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. याच धर्तीवर आता राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सादर केली आहे. महिला वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. याच धर्तीवर आता राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सादर केली आहे. महाराष्ट्र विधानसभेत आणि विधान परिषदेच्या अधिवेशनात १५ जुलै २०२५ रोजी ‘महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक (सेवा, सुविधा इत्यादी देण्याबाबत) अधिनियम, २०२५’ हे विधेयक मांडण्यात आले. या विधेयकानुसार राज्यातील ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. ही रक्कम महिलांनाही आणि पुरुषांनाही समान प्रमाणात दिली जाणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वृद्ध लोकांना याचा विशेष फायदा होणार आहे. योजनेच्या माध्यमातून ज्य...

राज-समाजकारणातील हे दोन दादा नक्की आहेत तरी कोण ?

इमेज
  बहुजन विचार चळवळीतील काही नावे ही फक्त नावं नसतात – ती ध्वजासारखी फडकत असतात, ज्याखाली अनेक पिढ्यांचा संघर्ष, वेदना, आणि प्रेरणा एकवटलेली असते. त्यातलीच दोन नावं – प्रविणदादा गायकवाड आणि मनोजदादा आखरे . अलीकडेच अक्कलकोट येथे प्रविणदादांवर झालेला शाईफेक प्रकार – हा केवळ एका माणसावरचा हल्ला नव्हता. हा हल्ला होता एका विचारावर , एका चळवळीवर , आणि लोकशाहीत मतभेदाला उत्तर देण्याऐवजी तोंड दाबून बसवण्याच्या कुजक्या वृत्तीवर . अर्थात, ज्यांना विचारांच्या रणांगणात हरायची भीती असते, तेच अशा गलिच्छ पद्धती वापरतात. बहुजन विचार चळवळीतील अतिशय आदराने घेतली जाणारी दोन नावे .. प्रविणदादा गायकवाड  आणि  मनोजदादा आखरे   अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर घडलेला शाईफेक प्रकार ही केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर एका विचारधारेवर कुजक्या विचार धारेतून घडलेली घटना. या घटनेने  अनेकांना मनस्ताप दिला ., पण त्याहून मोठं आश्वासन देणारी बाब म्हणजे – आज त्या दोन झंझावातासारख्या नेतृत्वकर्त्यांची एकत्रित भेट झाली ती पुण्यात ! होय, आम्ही बोलतोय ते  प्रविणदादा गायकवाड आणि मनोजदादा आ...

सत्तेतील मोकाट "कलाकारांना" कोण आवरणार? पटतंय का पहा! गजानन खंदारे

इमेज
पटतंय का पहा! नाही तर सोडून द्या.. आजच्या न्यूज चॅनेल्सनी स्वतःचा  एक ठराविक साचा तयार करून घेतला आहे – कुणी कोणाला काय बोललं, कोण कुणाला ढकललं, कोण रुसला, कोण फुगला, कसा फुटला, कोणत्या भाषणात कोणत्या मसाल्याचा वास जास्त आला – एवढंच! देशभर महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या, आरोग्य व्यवस्था यांसारखे खरे प्रश्न डोंगराएवढे वाढलेले असताना, टीव्हीवर मात्र "मोठे मुद्दे,खोटे मुद्दे" म्हणजे केवळ राजकीय बाचाबाचीचे थरारक सोहळे. खऱ्या समस्या तर बातम्यांच्या बुडाशी पण  दिसत नाहीत. काल वृत्तपत्रात दोन बातम्या डोळ्यात भरल्या. पहिली बातमी – “वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा!” दुसरी – “रस्त्यावर बसणाऱ्या मोकाट गुरांचा त्रास वाढला!” (काल कुणीतरी सांगत होते ,हल्ली शेतातल्या वन्य प्राण्यापेक्षा गावातल्या कुत्र्यांचा उपद्रव खूपच वाढलाय म्हणे !रात्र भर कलागत  करून विव्हळत असतात म्हणे ..रात्री ती अन दिवसा channel वरील ..आम्ही निजायचं कसं !) आता ह्या मागण्या नवीन नाहीत. कधी माकडांचा उच्छाद, कधी डुकरांची घाण, कधी भटक्या कुत्र्यांचे टोळके –असते , प्रत्येक वेळी प्रश्न तोच, मागणी तीच,  स...

प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला ,आम्हाला अजिबात खंत किंवा खेद नाही !

इमेज
संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ नेते  प्रवीण गायकवाड यांच्यावर कालपरवा  अक्कलकोट येथे झालेला हल्ला  केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर विचारांवर झालेला हल्ला होता. परंतु एक सामान्य नागरिक म्हणून  मला याबद्दल अजिबात खंत वाटत नाही. कारण आम्ही आधीच अनेक पातळ्यांवर गुलामी स्वीकारली आहे – आणि सगळ्यात मोठं दु:ख म्हणजे, आम्हाला त्या गुलामीची जाणीवच आमच्यात उरलेली नाही. सरकार, संस्था, किंवा मीडिया जर एखाद्या निर्भीड विचारवंतावर हल्ला करत असेल आणि आपण गप्प बसतो, तर आपण त्या अन्यायात अप्रत्यक्ष सहभागी  होतो. आज आपण मोबाईल, सोशल मीडिया, धर्म आणि पक्षांच्या घोषणांमध्ये स्वतःचं स्वातंत्र्य शोधतो. पण जेव्हा कोणी ह्या  गुलामगिरीचा बुरखा फाडण्याचा  प्रयत्न करतो  तेव्हा तो संघटना ,व्यक्ती आपल्याला अडचणीचा वाटतो. म्हणूनच ज्ञानेश  महाराव प्रविण  गायकवाडांसारख्या विचारवंतावर हल्ला होतो, आणि आपल्यातल्याच अनेकांना त्याचं काहीच वाटत नाही  हा विचार केवळ प्रतिक्रियेचा नाही – तर एक वैचारिक सावधानतेचा इशारा आहे. “गुलामाला आपलं बंधन दिसत नाही... आणि स्वातंत्र्...

... अन पंढरपूरची चंद्रभागा स्वच्छ झाली !

इमेज
👉 कामानिमित्त माझा दैनंदिन प्रवास नेहमीच सुरू असतो. मात्र,  वर्षातून एकदा तरी मी फॅमिली सह पर्यटनाला  जात असतो. यावर्षीही जाऊ जाऊ म्हणता दोन महिने उलटले. शेवटी पावसाळा सुरू झाला. जायचे तर होतेच त्यामुळे निर्णय घेतला आणि क्रूझर गाडी करुन आम्ही चार फॅमिली  पंढरपूर, कोल्हापूर सह गडकिल्ले पाहण्यासाठी दि. 21 जून 2025  रोजी सायंकाळी मार्गस्थ झालो.   या चार दिवसांच्या एकूणच प्रवासात अनेक ऐतिहासिक तथा धार्मिक ठिकाणांना भेटी दिल्यात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक,  धार्मिक आणि ऐतिहासिक ठेवा अनुभवला.   या प्रवासात गड किल्ल्यांच्या भेटीने तेथील दुरावस्था पाहून मन  गहिवरून आले.   पुढील प्रवास वर्णनात याबद्दल सविस्तर लिहीत आहेच.   हे प्रवास वर्णन चार दिवसांचे असल्यामुळे  इतर प्रवास वर्णनांपेक्षा बरेच विस्तृत असणार आहे.   जास्त पाल्हाळीक  न लिहिता  ठळक मुद्द्यांवरच  लिहीत आहे.   शनिवारी दि. 21 जून 2025 रोजी  रात्री 9 वाजता आम्ही  प्रवास सुरू केला.   ड्रायव्हरच्या ( शेषराव बोरक...

तुमचं कुटुंब,मुले व तुम्ही सुद्बा मोबाईलच्या कैदेत? हा vdo तुम्हाला जागं करेल !

इमेज
    साधारणतः 20-22 वर्षांपूर्वी  " करलो दुनिया मुट्ठी मे " ही जाहिरात अनेकांना भुरळ घालून गेली. संपूर्ण जग आपल्या हातात येणार म्हणून आपण सर्वांनीच मोबाईल स्विकारला. मात्र मुळे जग जसजसे जवळ  येऊ लागले तसंतसें नात्यातील भावनिक गुंता अधिक वाढू लागला.   मोबाईलमुळे जग जवळ आलं खरं, पण घरातली माणसं दूर होत गेली... एकाच खोलीत राहूनदेखील संवाद हरवला, नजर चुकवली, आणि नात्यांतलं ऊबट पणं वाढत गेलं. आपल्याच माणसांपासून आपण किती दूर गेलो एकाच घरात राहून देखील, नात्यांमध्ये अंतर कसं  वाढलं.हे आमचं आम्हालाच कळले नाही . स्क्रीनच्या प्रकाशात चेहऱ्यांवरची काळजी दिसेनाशी झाली, आणि आपण न बोलता तुटलो  हे आपल्याला उशिरा समजलं !                                                   या ‘चांगलं की वाईट’ याच्या नादात, आपली नैतिकता हरवली,  आपली संस्कृती गडप झाली,  आणि ‘शिकवायला घातलेली  मुलं – आज मोबाईलच्या जाळ्यात अडकून व्यसनांच्...

आ. गायकवाड तुम्हांला कायदा करण्यासाठी निवडून दिलं, कायदा हातात घेऊन मोडण्यासाठी नव्हे!

इमेज
    photo couresty: google news  सध्या सोशल मीडियावर आमदार संजय गायकवाड यांना हिरो ठरवले जात आहे. खराब जेवण दिलं म्हणून त्यांनी जो महाराणीचा र*** केला. तू कुठल्याही संवेदनशील माणसाला व लोकशाही व्यवस्थेवर प्रेम करणाऱ्या भारतीयाला अस्वस्थ करून जाणार आहे. मारहाण केली आणि एफडीएने कॅन्टीनचा परवाना रद्द केला’ — ही बातमी कोणत्याही समंजस नागरिकाला अंतर्मुख करणारी आहे. कारण इथे मारहाण करणाऱ्या आमदाराला काहीही झालं नाही, उलट ज्या कर्मचाऱ्यावर हात उचलला गेला त्या कॅन्टीनवरच शिक्षा झाली. हे दृश्य कुठल्याही लोकशाहीत सामान्य नाही, पण महाराष्ट्रात सत्तेच्या माजामुळे ते 'नवीन व सामान्य' होत चाललं आहे. कायदा करणारा आमदार, पण वर्तन गुंडगिरीचं शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचं वादग्रस्त इतिहास आता कुणापासून लपलेला नाही. फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचा विषाणू कोंबण्याची भाषा, राहुल गांधींची जीभ कापण्याचं बक्षीस, संभाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य, मतदारांना दारू-मटण प्रिय असल्याचं अपमानजनक विधान, पोलिसांवर लांचखोरीचे आरोप, शेतकऱ्यांना शिवीगाळ... आणि आता कँटीनचा वाद. या प्रकरणात त्य...