पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रावणात भक्ती कशी करावी? नाहीतर देव करायला गेले आणि ...

इमेज
  भूमिका / निवेदन                  श्रावणात उपासनेचे महत्त्व वाढते. तथापि, चुकीच्या पद्धती (जसे की अशास्त्रीय पूजा, दिखाऊपणा, पर्यावरणाचा नाश) यामुळे "देव करायला गेले आणि खेव मागे लागला" अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे भक्तांनी   साधी आणि पर्यावरणपूरक उपासनाच  कशी करावी, याबाबत खालील लेख पारंपरिक ग्रंथ, संत साहित्य, सामाजिक अवलोकन, अनुभवी अभ्यासकांचे लेख आणि सामाजिक निरीक्षण यावर आधारित कमीत कमी शब्दात  मांडण्याचा हा प्रयत्न --संपादक   श्रावण महिना आला की शिवाची उपासना, व्रतवैकल्यं, पूजाअर्चा या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं. पण आजकाल बऱ्याच ठिकाणी या उपासना चुकीच्या पद्धतीने केल्या जातात. काहीजण फक्त मोठेपणासाठी महागड्या पूजा करतात, तर काहीजण सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी शिवभक्ती करतात. यातून खरी भक्ती हरवते आणि उलट मनात अहंकार, गोंधळ, आणि चिडचिड वाढते. म्हणूनच आपण विचार केला पाहिजे की खरी शिवभक्ती म्हणजे नक्की काय आणि ती कशी करावी. शिव म्हणजे फक्त देवळातली एक मूर्ती नाही. शिव हे एक चैतन्य...

"माझा बाप फुलं देतो… भक्त देवाला चढवतात… मग पुण्य कुणाला मिळतं?" ! एक खरखुरे वास्तव

इमेज
  झेंडूचा सडा आणि TRP ची पूजा गोष्ट फार जुनी नाहीच. 2016 चे साल होते.दसऱ्याची  सुट्टी असल्याने आम्ही टीव्ही लाऊन बसलो होतो .   पंकजा मुंडेंनी भगवान गडावरचा होणारा दसरा सोडून सावरगावात मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले. आणि लगेचच विरोधकांच्या गिरणीत नव्या पीठाचं दळण सुरू झालं. राजकीय, धार्मिक, सामाजिक सगळा मसाला मिक्स करून टीव्ही वाल्यानी थेट  खिचडीच लावली. गडावर काय होणार? गडाखाली काय घडणार ?     पंकजाताईंच्या भाषणात किती आणि कसं बोलणार! याचीही आकडेवारी कॅमेरावाले मोजत होते. कोणत्या पायऱ्यांनी कोण वर जाणार हे पण सांगत होते  — जणू देशाचं भवितव्य त्या पायऱ्यांवर लटकलेलं होत ! मंडळी तयारीला लागली. पण मेळाव्याच्या भाषणांची काळजी महंत, कार्यकर्ते, पक्षांना कमीच, आणि टीव्हीवाल्यांनाच  जास्त होती . त्यांच्या डोळ्यात "लाइव" ची  सोनेरी फ्रेम चमकत होती — नेमका त्याच टायमाला माझा भाऊ नागपुरात,अन बाप पुण्यात होता — पुण्यांच्या  व्यवहारात मग्न असलेला बाप भक्तांसोबत फुलांचा सौदा करत, रस्त्यावर फुलं मोजत बसला होता , पण त्याच्या हातात फक्त ...

शेतकरी आत्महत्या–खरंच कर्जा मुळे होतात का? खरे कारण काय ! तुम्हीही जाणून ...

इमेज
  भारतात शेतकरी आत्महत्या हा केवळ एक आकडा नाही, तर देशाच्या ग्रामीण हृदयावरचा एक खोल जखमेचा ठसा आहे. प्रत्येक वर्षी हजारो शेतकरी शेती सोडून जीवन सोडण्याचा निर्णय घेतात. सामान्यत: या घटनांचे कारण म्हणून नैसर्गिक आपत्ती – दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस,शेती पिकत नाही .इत्यादी   – कारणांचा उल्लेख केला जातो. पण खरंच ही गोष्ट खरी आहे काय ? एवढीच आहे का? कि यामागे इतर कारणे आहेत ..? नैसर्गिक आपत्ती –हे एक कारण , पण एकमेव नाही हवामानातील अनिश्चितता ही नक्कीच एक महत्त्वाची कारणं आहे. पिकांचे नुकसान, उत्पादनात घट, आणि बाजारभाव कोसळणे यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसतो. तरीसुद्धा, अनेकदा अशा परिस्थितीतून शेतकरी पुन्हा उभे राहतात. मग काही शेतकरी का नाही?  मानसिक व सामाजिक घटक – शेतकरी आत्महत्येतील लपलेली कारणे शेतकरी आत्महत्येबाबत बोलताना आपण बहुतेक वेळा कर्ज , नैसर्गिक आपत्ती किंवा पिकांच्या भावाचा घसरलेला दर यांवरच लक्ष केंद्रित करतो. पण शेतकऱ्याच्या आयुष्यात असे अनेक मानसिक आणि सामाजिक घटक असतात, जे त्याला टोकाचा निर्णय घेण्यापर्यंत ढकलतात.  ...

चला आता "आजपासून एक नवा नियम! "

इमेज
 आठवतय का पहा ! २०१६ : रांगेतली  नोटबंदी सामान्य माणसाच्या कुटुंबातला कर्ता माणूस  जर घरातल्या कुणालाही न सांगता एखादा ‘धाडसी’ निर्णय घेतो आणि तो निर्णय अंगलट येतो, तर आपल्या  घरातल्या सिनेमाचं कथानक ठरलेलं असतं... अख्खं कुटुंब त्याच्यावर तुटून पडतं – "विचार नाही, पुस नाही, व्यवहार नाही… घातलंस ना घर पाण्यावर!" टोमण्यांचा भडिमार सुरू होतो. कदाचित ! त्याच्याकडून घरखर्चाच्या हिशोबाची पाटी काढून घेऊन कारभारी पण  बदलला जातो . पण याच प्रकारचं धाडस जर  कुठलाही सार्वजनिक संवाद न करता,  देशाच्या कारभाऱ्याने केलं, आणि देशातल्या १३५ कोटी लोकांना एकाच झटक्यात “चला, आता नवीन नियम” असं जाहीर करून वेठीस धरलं,  तर काय होतं? तर  त्याचे परिणाम तुम्ही आम्ही सर्वच भोगले  आहेत  .तेव्हा तुम्ही आम्ही   थोडा भूतकाळ आठवून, ,चाचपून बघायला हरकत नसावी . २०१६ – नोटबंदीचा प्रयोगशाळा दिवस ८ नोव्हेंबर २०१६. संध्याकाळी टीव्हीवर देशाचे कारभारी आले, गोड हसू देत जाहीर केलं — “आजपासून ₹५०० आणि ₹१००० च्या नोटा कायदेशीर राहणार नाहीत.” भ्रष्टा...

एकाच दोरीला पतीपत्नी लटकतात, सरकारचे काळीज का फाटत नाही?

इमेज
     आपल्या आजूबाजूला दररोज अनेक घटना घडत असतात. काही हृदय पिळवटून टाकणाऱ्या असतात, तर काही अजब-गजब, विस्मयकारक. आपण त्या एक बातमी म्हणून पाहतो, दोन क्षण चर्चा करतो… आणि मग विसरून जातो. नव्या घटना पुन्हा आपल्या नजरेसमोर येतात आणि मागच्या आठवणी पुसून टाकतात. पण एक घटना मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून कायम आपल्या समोर उभी आहे — शेतकरी आत्महत्या . या विषयावर चर्चा होते, भाषणे होतात, आश्वासने दिली जातात. सरकारे बदलली, माणसं बदलली, योजना बदलल्या… पण तोडगा मात्र कधीच बदलला नाही . कर्जबाजारीपणाची, पिकांच्या भावाची, निसर्गाच्या कोपाची, आणि सरकारी निष्क्रियतेची साखळी तशीच राहिली. अशा घटना जागतिक महासत्ता असल्याचा गर्व मिरवणाऱ्या आपल्या व्यवस्थेला लागलेला एक अमिट कलंक आहेत, असे म्हणणे अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. अशीच एक घटना पुन्हा नव्याने समोर आली आहे . दुःखद आणि काळीज पिळवटून टाकणारी हि  घटना — भरोसा गावच्या शेतकरी दाम्पत्याने एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश श्रीराम घुंटे आणि रंजना गणेश घुंटे — ही फक्त दोन नावे नाहीत, तर दोन जीवंत हृदयं होती, ज्यांनी ...