मुली व पालकांच्या या तिन अपेक्षा मुळे लग्न जुळत नाहीत
मुलींच्या किंवा त्यांच्या पालकांच्या या तीन अपेक्षांमुळे तरुण मुलांची लग्न जमत नाहीत.
असं तरुण मुलं म्हणतात.
मात्र या मागचं खरं वास्तव काय आहे ते समजून घेतलं पाहिजे.
तरुण मुलं म्हणतात की, मुलींच्या आणि विशेषता त्यांच्या पालकांच्या अपेक्षा भयंकर वाढलेल्या आहेत.
‘वेल सेटल्ड’ या दोन शब्दांत सारं जग सामावलेलं असतं.
त्यामुळे अनेकदा मुलीच नकार देतात.
मात्र तरीही ढोबळमानानं मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या 3 अपेक्षा असतात असं आम्हाला मराठा लग्न अक्षता मध्ये काम करताना दिसून आलं.
मुलाचं स्वतर्च्या मालकीचं घर हवंच.
शहरात उत्तम पगाराची नोकरी हवी,
शहरातच घरही हवं. मात्र सोबत गावाकडे भरपूर शेती पण हवी.
शक्यतो कुटुंब छोटंच हवं. लग्नानंतर कुटुंबीयांची जबाबदारी घ्यायला नका
आता ही एक बाजू झाली.
आजही लग्नासाठी योग्य असलेली मुले ही ग्रामीण भागात राहतात आणि ग्रामीण भागातील लोकांची नाळ अजूनही आपल्या संस्कृती परंपरेचे शेतीशी आणि मातीशी जोडलेली आहे.
आजच्या काळात लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा काही प्रमाणात वाढल्यात असं म्हणणं खरं ठरू शकतं — पण यामागे अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक कारणं आहेत.
ग्रामीण भागातील अनेक महिला अजूनही आपल्या डोक्यावरील पदर ढळू देत नाही. तर शहरात मुली सुद्धा दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर येत आहे.
हे चित्र दिवसेंदिवस अधिक भयानक होत आहे.
मात्र अजूनही काही वास्तविकता यापेक्षा वेगळी आहे.
सत्य हेही आहे की, काही मुली किंवा त्यांच्या घरच्यांकडून "सरकारी नोकरी पाहिजेच", "15-20 लाखं हुंडा" किंवा "सिटीमध्ये घर पाहिजेच" अशा मागण्या वाढल्या आहेत — त्या मूल्यांपेक्षा स्थावर गोष्टींना अधिक महत्त्व देतात, ही चिंतेची बाब आहे. समाजात वाढलेली स्पर्धा आणि वरच्या थरातील लोकांचं अनुकरण ही यामागील कारणं असू शकतात.
समाज जीवनामध्ये वावरताना जर काही गोष्टींचे निरीक्षण केलं तर यातून अनेक तथ्य समोर येतांना दिसतात.
गेल्या आठ-दहा वर्षात अनेक मुलींची लग्न झाली
अनेकांनी पोटापुरता कमावणारा जावई पाहिला..
मात्र लग्न झाल्यावर दोन वर्षांनी चार वर्षांनी जावईबापूला दारूचे व्यसन लागले.
घरात भानगडी सुरू झाल्या.
काही दारूच्या व्यसनापाई लवकरच हे जग सोडून निघून गेले काही अपघातात गेले
आज अनेक तरण्या मुली, कडेवर दोन वर्षाचे लेकरू घेऊन पांढऱ्या कपाळाने निराधार च्या पगारासाठी तहसीलच्या चकरा मारतात.
आपला जावई जर दारू पीत असेल किंवा भानगडी खोर असेल घरात खायचे वांधे असतील तर आपल्या पोटच्या मुलीचे असे हाल पाहून कुठल्या मायबापाला चांगल वाटेल हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
समाज बदलतो आहे संस्कृती परंपरेच्या नावाखाली आपण नको ते धिंगाणे घालतो आहे या सर्व गोष्टींचा सारासार विचार समाज सेवकांनी केला पाहिजे.
आजच्या काळात लग्न हे केवळ दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन विचारसरणींचं, दोन कुटुंबांचं मिलन आहे. त्यामुळे अपेक्षा असणं चांगलं, पण त्या यथार्थ आणि परस्पर समजुतीवर आधारलेले असणं आवश्यक आहे.
केवळ मुली मिळत नाही ही ओरड करून चालणार नाही किंवा मुलींनी सुद्धा अवास्तव अपेक्षा ठेवून चालणार नाही हे मात्र खरे
तुम्हांला काय वाटते?
Disclaimer:
हा मजकूर केवळ सामाजिक समुपदेशनाच्या हिशोबाने व विवाहपासून फसवणूकी पासून सावध करण्याच्या हिशोबाने आहे.
वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा